Posts

Showing posts from 2016

“ शिवस्मारक नव्हे हे तर शिवसंस्कार मारक ’’

“ शिवस्मारक  नव्हे हे तर शिवसंस्कार मारक ’’     बदल हा काळानुरूप होत आहे .   आणि तो व्हायला देखील हवा .   परंतु असाच एक घटक ज्यात सृष्टीची उत्पत्ती झाल्यापासून ते आजच्या टेक्नॉसेव्ही जगापर्यंत काडीमात्र बदल झालेला नाही .   हा घटक म्हणजे अर्थातच राजकारण .   तसे राजकारणात बरेच बदल झाले .   परंतु विशेषतः भारतीय     राजकारणाच्या बाबतीत भौतिक स्वरूपात हे मोठ्या प्रमाणावर बदल झाले .   पण याच भारतीय राजकारणाच्या मानसिकतेत मात्र आजवर तिळमात्र बदल झालेला नाही .   त्या त्या काळातील साम्राज्यवाद व त्या साम्राज्यवादाचे नेतृत्व करणारी व्यक्ति   ,   संघटना ही या भारतीय राजकारणातील निकृष्ट मानसिकतेची उदाहरणे ठरतील   .   अशीच निकृष्ट मानसिकतेची जाणीव ही दिनांक १३ मार्च २०१५ तारखेनंतरच्या कालावधीत     झाली .   यात प्रामुख्याने दोन घटक होते .   एक म्हणजे   ‘ लेख व्यवस्थित न वाचता त्यात शब्दांची अफरातफर करून पोस्ट करणारे लोक ’   व दुसरे म्हणजे राजकारण .     टि ....

कविता :- पत्रास कारण की........!

                                '' पत्रास कारण की........! ''  ''कॉलेजमध्ये ज्यावेळी तू मला पहिल्यांदा  पाहिलस, त्या वेळेसच  तू प्रेम वेडा झालास, तुझ्या या प्रेमाचं उत्तर म्हणून सुंदर हास्य मी केलं आणि त्या हास्यालाच तू भावलास, अश्रू  तुझे घेत आहे, हास्य माझं  घेऊन जा मला मात्र विसरून जा.............! प्रेमाचं  प्रतिक म्हणून सुंदर गुलाब दिलस तू मला गुलाबाचा हाच सुगंध घायाळ करायचा मला, पाकळ्या त्या घेत आहे, काटे तू घेऊन जा मला मात्र विसरून जा.............! प्रिय सखी - सखा म्हणत एकमेकांना पत्र आपण पाठवली वरून सारं पत्र मराठीत जरी असलं , तरी पत्राची शेवट मात्र इंग्रजीच्या 'आय लव्ह यू'  च्या तीन शब्दांनीच झाली, शब्द तुझे घेत आहे, निव्वळ कोरा कागद तू घेऊन जा, मला मात्र विसरून जा...............! लपून छपून भेटायचो आपण एकमेकांना चोरून भेटण्याचा तो आनंदच होता वेगळा सुख तुझं  घेत आहे, दुःखं  माझं  घेऊन जा, मला मात्र विसरून जा..............! प्रेमाच्या ...